Quantcast
Channel: Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 173382

पाच वर्षांत ४० हजार अंगणवाड्या

$
0
0

शहरी भागात दहा हजार पाळणाघरांची उपलब्धता

sharmila.kalgutkar@timesgroup.com

मुंबईः कुपोषणाची समस्या सोडवण्यासह शहरी भागातील नोकरदार महिलांच्या मुलांना पाळणाघरे उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. येत्या पाच वर्षांत चाळीस हजार अंगणवाड्या उभारून त्यातील दहा हजार अंगणवाड्यामध्ये विशेष पाळणाघरे सुरू करण्यात येणार आहे. शहरी भागातील नोकरदार महिलांसाठी हा निर्णय दिलासा देणारा असून मुंबई, पुणे, नागपूर, नाशिक येथील शहरी भागामध्ये या अंगणवाड्यांमध्ये विशेष पाळणाघरे उभारली जाणार आहेत.

राज्यातील कुपोषणाची समस्या प्रत्येक वर्षी गंभीर स्वरूप धारण करत आहे. वेगवेगळ्या पातळ्यांवर भरीव प्रयत्न करूनही मुलांच्या कुपोषणाची समस्या अद्याप सुटलेली नाही. अंगणवाड्यांमध्ये या मुलांना पोषक आहार दिला जातो. या पोषक आहाराचा दर्जा व त्याची उपलब्धता वाढवली तर मुलांमधील कुपोषणाचे प्रमाण नक्कीच कमी होईल, या विश्वासाने या अंगणवाड्यांचा विस्तार केला जाणार आहे.

अंगणवाड्यांचे सध्याचे स्वरूप पाहिले तर शिक्षण, मनोरंजन आणि पोषक आहाराचे त्रिसूत्र येथे पाळले जाते. मात्र राज्यातील सर्व अंगणवाड्यामध्ये शिकवण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये सूसुत्रता नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमामध्ये सूसुत्रता व समन्वय असावा, यासाठी महिला व बाल कल्याण विभागाच्या राज्य शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण समितीच्यावतीने नव्या अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली आहे.

अंगणवाड्यांना मिळणार ई-टच

अंगणवाड्यांची उपलब्धता वाढ‍वण्यासाठी पहिल्या टप्प्यात चार हजार अंगणवाड्यांसाठी केंद्र सरकारने निधी मंजूर केला आहे. ई-तंत्रज्ञानाने राज्यातील सर्व अंगणवाड्यांना जोडण्यात येणार आहे. तसेच या अंगणवाड्यांचे बाह्य स्वरूप समान असावे, यासाठी विशिष्ट पद्धतीने त्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. अंगणवाड्यांच्या तपशील तसेच योजनांची माहितीचे अपडेट देण्यासाठी ई-नेटवर्क सुरू करण्यात येणार आहे.

हा बदल अपेक्षित...

पूरक पोषक आहाराच्या (टी.एच.आर.) वापराबाबत ऑगस्ट २०१३ मध्ये झालेले सर्वेक्षणामध्ये अंगणवाड्यांमध्ये देण्यात येणारा आहाराच्या दर्जासंदर्भात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. टीएचआर वाटप योजनेसाठी शासनाकडून वर्षाला साधारणत ३०० कोटी खर्च केले जातात, असे समजते. तीन वर्षांखालील मुले जी अंगणवाडीत जाऊ शकत नाहीत, त्यांच्यासाठी पोषक आहाराची पाकिटे देणे ही या योजनेमागची संकल्पना चांगली असली तरी महाराष्ट्रात पोषण हक्कावर काम करणाऱ्या संस्था-संघटनांच्या निरीक्षणांनुसार टीएचआरच्या वापराबाबत फारशी समाधानकारक नसल्याचे आढळून आले आहे.

अंगणवाड्यांची उपलब्धता वाढवण्यासाठी भरीव प्रयत्न केले जात आहे. हा त्याच प्रयत्नांमधील महत्त्वाचा टप्पा आहे. मुलासह स्तनदा माता, गर्भवती महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्यात येणार आहे. मुलांचे आरोग्य सुधारण्यासह आई व बाळाची काळजी घेणे हासुद्धा महत्त्वाचा उद्देश आहे.

- पंकजा मुंडे, महिला व बाल विकास मंत्री

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 173382

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>