Quantcast
Channel: Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Lok Sabha Election Result 2024 News in Marathi | Maharashtra Times
Viewing all articles
Browse latest Browse all 173382

‘जय भिम, जय भारत’ नाटकाचा वाद टोकाला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

'आकार' या संस्थेच्या 'जय भिम, जय भारत' या नाटकाचा वाद आता टोकाला पोहोचला असून, नाटकातील आक्षेपार्ह बाबी काढल्या तरच परवानगी मिळेल या मुद्द्यावर सेन्सॉर बोर्ड अडून बसले आहे. सेन्सॉर बोर्डाचा निर्णय न पटल्यास त्याविरोधात कोर्टात जाण्याचा मार्ग संस्था व लेखकांना मोकळा असल्याचे बोर्डाने स्पष्ट केल्याने त्यामुळे वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.

'जय भिम, जय भारत' हे नाटक सध्याच्या राजकीय, सांस्कृतिक विषयावर भाष्य करते, असा दावा लेखक-निर्मात्यांनी केला आहे. यामध्ये खैरलांजी हत्याकांड, रमाबाई आंबेडकर नगर असे काही संदर्भ व शब्द गाळण्यास सेन्सॉर बोर्डाने सांगितले आहे. त्याचबरोबर नामदेव ढसाळ यांची विविध विद्यापीठात अभ्यासाला असलेली 'गोलपिठा' या काव्यसंग्रहातील 'माणसाने' या कवितेतील काही ओळीही गाळायला सांगितल्या आहेत. सेन्सॉर बोर्डाने असे एकूण १९ आक्षेप लेखक जनार्दन जाधव यांना कळवले आहेत. दलित व अल्पसंख्याकांवरील अन्यायाचे चित्रण, जातीयवाद, धर्मांधता, अंधश्रद्धेवरील टीका सेन्सॉर बोर्डाला मान्य नसल्याची टीका यावेळी जाधव यांनी केली. यासंदर्भात सनातनी आक्षेप घेतील, असाही मुद्दा मांडण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या आक्षेपांसह नाटक सादर करणे अशक्य असल्याचे मत या नाटकाचे सूत्रधार आणि सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांनी नोंदवले.

आंदोलनाचा पवित्रा

या आक्षेपांचे लेखी स्पष्टीकरण आवश्यक असल्याची मागणी या नाटकाच्या चमूतर्फे करण्यात आली आहे. लेखकाच्या मुलभूत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ही मुस्कटदाबी असल्याचा निषेध म्हणून या विरोधात आंदोलनाचा पवित्रा घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. या नाटकातील आक्षेप वगळले तर केवळ ७ फेब्रुवारीच्या प्रयोगासाठी त्यांना तात्पुरते प्रमाणपत्र देण्यात आले आहे. याबद्दलही नाट्यसंस्था व कलाकारांनी आक्षेप घेतला आहे.

'प्रसिद्धीसाठीचा उपदव्याप'

या नाटकाच्या वादाबद्दल बोलताना नाटककार आणि सेन्सॉर बोर्ड सदस्य अशोक समेळ यांनी, हा प्रसिद्धीसाठीचा उपदव्याप असल्याची टीका केली. 'जाधव यांच्याशी चर्चा झाली तेव्हा त्यांनी या आक्षेपार्ह बाबी काढून टाकणार असल्याचे सांगितले होते', असेही समेळ यांनी स्पष्ट केले. 'या नाटकामुळे जनभावना भडकतील, आठवणींच्या खपल्या निघतील त्यामुळे हे नियमात बसत नसल्याने आक्षेप नोंदवले होते', असेही ते म्हणाले.

मोबाईल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


Viewing all articles
Browse latest Browse all 173382

Trending Articles



<script src="https://jsc.adskeeper.com/r/s/rssing.com.1596347.js" async> </script>